Sunday, 15 May 2016

मनुस्म्रूती : ब्राम्हणशाहीचा अनैतीक कायदा...

मनुस्म्रूती : ब्राम्हणशाहीचा अनैतीक कायदा...

मनुस्म्रुती कायद्याची हुकुमावली भारतभर पसरलेल्या बौद्ध धर्माचा पाडाव करण्यासाठी झाली. बौद्ध धर्म भारतात पसरला तेव्हा ब्रम्हणशाहीला तडा गेला. ज्यानेही बुद्ध तत्व ऐकले तो भिक्शुक झाल्याशिवाय राहत नसे. बुद्ध तत्वाचा समाजावर पगडा बसला होता. त्यामुळे ब्राम्हणांचे होम, कर्मकांडाचे धंदे बंद पडले. याचा परिणाम म्हणून ब्राम्हणांनी बंद केले आणि बौद्धांविरुद्ध शस्त्र उचलून त्याचा पाडाव करावयास सुरुवात केली. त्यांनी  बौद्ध धर्म प्रचारक भिक्खुंच्या कत्तली केल्या पण बुद्ध तत्वे माणसांच्या मनातुन जायला तयार नव्हती. म्हणून ब्राम्हणांना उच्च दर्जाचे स्थान मिळवून देण्यासाठी नी बुद्ध तत्व नाहीशी करण्यासाठी ब्राम्हणांनी मनुस्म्रुती कायद्याची सुरुवात केली.

मनुस्म्रूती ब्राम्हणांविशयी :
अ. 1, श्लो. (93) - ब्राम्हणाचा जन्म हा ब्रम्हाच्या मुखातुन झाला असल्याने त्याचा जन्म सर्वप्रथम झाला आहे म्हणून त्याला वेदाचा अधिकार आहे. विश्वनिर्मात्याने त्याला दिलेला हा अधिकार आहे.
1,(98) - पवित्र वेदांचा मुर्तीमंत अवतार म्हणजे ब्राम्हणाचा जन्म होय. तो देवच होय.
1, (100) - जगात जे काही आहे ती सर्व ब्राम्हणाची संपत्ती असते. त्याच्या उपजत बुद्धीमत्तेमुळे त्याला खरोखर या सर्व गोष्टींचा अधिकार प्राप्त होतो.
10,(3) - त्याच्या पावित्रामुळे ब्राम्हण हा सर्व जातींचा देव आहे.
7,(37) - तीनही वेदात निपुन पारंगत असलेल्या ब्राम्हणाची सकाळी लवकर उठून राजाने पूजा करावी.
11,(35) - ब्राम्हणाला विश्व निर्माता, शिक्षा देणारा, गुरू म्हणून घोशीत करण्यात आलेले असल्याने कोणतीही व्यक्ती त्याला अपमानास्पद बोलू शकत नाही किंवा अर्वाच्च शब्द ऊच्चारु शकत नाही.
9,(313) - जरी दैंन्यावस्ता आली तरी राजाने ब्राम्हणाला राग येईल असे प्रक्शुब्द वर्तन करू नये. जर ब्राम्हणाला राग आला तर तो सैंन्य व रथांच्या मदतीने त्याचा सर्वनाश करील.
11,(31) - ब्राम्हणाला कायदा माहीत असल्याने त्याचा अपराध करणाऱ्या अपराध्यास राजासमोर उभे न करता ब्राम्हण स्वतः त्याला शिक्षा देऊ शकतो.
9,(317) - ब्राम्हण मग तो सुशिक्षित असो किंवा नसो त्याला दैवी सामर्थ्य असते. अग्नीच्या अंगी जशी दैवी शक्ती असते तितकीच दैवी शक्ती ब्राम्हणांच्यात असते.
9,(319) - अश्याप्रकारे ब्राम्हणाने जरी कोणताही व्यावसाय केला तरी त्याचा सन्मान केला पाहीजे.
11,(6) - प्रत्येकाने स्वतःच्या क्षमतेनुसार एकांतप्रिय वेदाभ्यास करणाऱ्या ब्राम्हणास संपत्ती द्यावी म्हणजे म्रूत्युनंतर त्याला स्वर्गप्राप्ती होऊ शकते.

ब्राम्हणाच्या या व्याख्यामुळे मनुने ब्राम्हणास राजापेक्षाही वरचा दर्जा देण्यात आला होता.

मनुस्म्रूती शुद्रांविशयी :
(ब्राम्हण, क्षत्रीय व वैश्यांच्या कुटुंब प्रमुखांना )
1,(91) - ब्राम्हण, क्षत्रीय व वैश्य या तीन वर्णातील लोकांची सेवा करणे एवढेच काम परमेश्वराने शुद्रांना दिले आहे.
2,(31) - ब्राम्हणाच्या मुलाच्या नावातील पहिल्या भागातुन शुभसुचकता व्यक्त झाली पाहीजे. क्षत्रीयाच्या नावातुन शौर्य पराक्रम सुचित झाला पाहीजे. वैश्याच्या नावातुन संपत्ती आणि शुद्राच्या नावातुन तिरस्कार सुचित झाला पाहीजे.
4,(61) - ज्या देशात शुद्र राज्यकर्ता आहे त्या देशात राहु नये.
11,(24) - होम आदी धार्मिक विधीसाठी ब्राम्हणाने शुद्राकडे संपत्ती मागु नये.
8,(374) - उच्चवर्णीय विवाहात किंवा अविवाहीत स्त्रीशी जो शुद्र समागम करेन त्याला पुढील प्रमाणे शिक्षा करावी. जर अविवाहीत स्त्री असेल तर तो गुन्हा करणारा त्याच्या शरीराचा भाग कापून टाकावा. जर विवाहीत स्त्री असेल तर त्या शुद्रास म्रुत्यूदंड देऊन त्याची संपत्ती जप्त करावी.
8,(20) - जो वंशपरंपरेने ब्राम्हण आहे. मग त्याने वेदाचा अभ्यास केला असो वा नसो राजदरबारात त्यानेच न्यायदानाचे कार्य करावे. परंतु शुद्र कितीही सुशिक्षित असला तरी त्याला तो अधिकार नाही.
8,(272) - शुद्र जर ब्राम्हणाला धर्म शिकऊ लागला तर राज्याने त्याच्या तोंडात व कानात उकळते तेल ओतावे.
4,(99) - ब्राम्हण, क्षत्रीय , वैश्य यांनी शुद्रासमोर वेदपठण करू नये.
3 (156) - शुद्राने जर वेद पठण केला किंवा ऐकला तर त्याच्या कानात उकळत्या शिशाचा रस ओतावा, त्याची जीभ काटुन फेकावी.
10,(129) - शुद्राला जरी संपत्ती साठवण्याची क्षमता असली तरी तो गुलाम असल्याने त्याने धनसंचय करू नये.
10,(121) - ब्राम्हणाची चाकरी करून जर शुद्राचा चरीतार्थ चालत नसेल तर त्याने क्षत्रीयाची किंवा वैश्याची सुद्धा चाकरी करावी.
10,(123) - ब्राम्हणाची सेवा करणे हाच शुद्रासाठी सर्वोत्तम व्यावसाय सांगण्यात आला आहे. त्याखेरीज त्याने इतर कोणताही व्यावसाय केला तर त्याचे फल त्याला मिळणार नाही.
8,(417) - ब्राम्हण जर विपन्नावस्तेत असेल तर चरीतार्थासाठी त्याने विनासंकोच शुद्राची मालमत्ता जप्त करावी.
8,(413) - विश्व निर्मात्याने शुद्राला ब्राम्हणाचे गुलाम म्हणून निर्माण केले असल्याने त्याने ब्राम्हणाकडे मोबदल्याने किंवा विनामोबदला गुलामगिरी करावी.
8,(270) - जो शुद्र ब्राम्हणाचा अपमान करेल त्याची जीभ छाटुन टाकावी. कारण तो हलक्या जातीतील आहे.
8,(271) - जर शुद्राने तिरस्काराच्या भावनेने ब्राम्हणाच्या नावाचा वा जातीचा उच्चार केला तर त्याच्या 10 बोटात खिळे ठोकावेत व तोंडात लाल तप्त पहार कोंबावी.
8,(280) - शुद्राने हात किंवा काठी उगारली तर त्याचा हात छाटुन टाकावा. जर रागाने त्याने लाथ मारली तर त्याचे पाय कापून टाकावेत.

मनुस्म्रूती विवाहासंदर्भी :
3,(12) - ब्राम्हणाचा पहिला विवाह असेल तर स्वजातीतील स्त्रीशीच लग्न करावे. पुनर्विवाह असेल तर इतर 3 वर्णातील स्त्री असली तरी चालू शकेल.
3,(13) - शुद्र स्त्री ही शुद्राचीच पत्नी असली पाहीजे, ती आणि वैश्य स्त्री वैश्याची त्या दोघी व क्षत्रीयाची स्त्री क्षत्रीयाची त्या तिघी व ब्राम्हण स्त्री ब्राम्हणाची पत्नी होऊ शकते.
3,(15) - ब्राम्हणाने मुर्खपणाने शुद्र स्त्रीशी विवाह केला तर त्याचे कुटुंबिय व मुलांनाही शुद्राचा दर्जा प्राप्त होतो.

मनुस्म्रूती आर्थासंबंधी :
8,(35) - जी व्यक्ती ही संपत्ती माझी स्वतःची आहे असे खरे सांगेल त्या संपत्तीचा 6 वा किंवा 12 वा हिस्सा राजाने स्वतःकडे सुरक्षित ठेवावा.
8,(36) - परंतु जो खोटे विधान करेल त्याच्या संपत्तीचा 8 वा हिस्सा दंड म्हणून जप्त करावा. किंवा ज्या संपत्तीबाबत खोटे विधान केले असेल तितक्याच किंमतीचा त्याच्या मालकीची संपत्ती राजाने जप्त करावी.
8,(37) - विद्वान ब्राम्हणास जर गुप्त खजिना सापडला तर ती सर्व संपत्ती त्याने घ्यावी. कारण ब्राम्हण सर्वाचा प्रमुख आहे.
8,(38) - परंतु एखादी संपत्ती पूर्वी जमिनीत ठेवली असेल व ती संपत्ती राजाला सापडली तर राजाने अर्धी संपत्ती घ्यावी व उरलेली अर्धी संपत्ती ब्राम्हणास द्यावी.

मनुस्म्रृती स्त्रीयांविशयी :
मनुने स्त्रियांना नेहमी तुच्छ मानले.
2,(213) - पुरूषांना भ्रश्ट करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे. स्त्रियांच्या सहवासात शहाणा माणूस कधीच सुरक्षित राहू शकत नाही.
2,(214) - फक्त मुर्खांनाच नव्हे तर विद्वान पुरूषांनाही स्त्रिया आडवाटेने नेण्यास समर्थ असतात. स्वतःच्या क्रोधाने व ईच्छेने त्या पुरूषांना गुलाम बनवतात.
2,(215) - कोणत्याही व्यक्तीने स्वतःच्या आईजवळ, बहीनीजवळ किंवा मुलीजवळ एकांतात बसू नये कारण  पुरूषाच्या भावना या अतिशय तीव्र असतात.
9,(2) - दिवस आणि रात्र 24 तास कुटुंबातील पुरूषाच्या नजरेत स्त्रीला ठेवले पाहीजे. जर कामवासनेचा आनंद हवा असेल तर तिला एकाच पुरूषाच्या नियंत्रनाखालि ठेवले पाहीजे.
9,(3) - स्त्रीचे बालपणी तिचा पिता तिचे रक्षण करतो, तरुणपणी पती आणि व्रूद्ध वयात तिची मुले संरक्षण देतात. कोणत्याही काळात स्त्री स्वतंत्र राहण्यास योग्य नाही.
9,(14) - स्त्रियांनी स्वतःच्या सौंदर्याची फिकीर करू नये किंवा विशिष्ट वयावर लक्ष केंद्रित करू नये. तो पुरूष आहे. मग तो कुरुप आहे की सुंदर याचा विचार करू नये. फक्त पुरूष आहे एवढाच विचार करावा.
4,(147) - मुलीने, तरूण स्त्रीने किंवा वयस्कर स्त्रीने कोणतीही गोष्ट स्वतःच्या स्वतंत्र बुद्धीने करू नये.
5,(149) - स्त्रीने स्वतःला पिता, पती व पुत्र यांच्यापासुन अलग, वेगळे स्वतंत्र समजू नये. तसे तिने केल्यास तिला तुच्छ मानले जाईल.
9, (45) - एकदा स्त्रीने विवाह केला की ती स्त्री पतीपासुन कधीही स्वतंत्र राहू शकत नाही.
9,(416) - पत्नी, मुलगा व गुलाम या तिघांचा संपत्तीचा अधिकार नाही. त्यानी कमवलेली संपत्ती ही ते ज्याच्यावर अवलंबून असतील त्याच्या मालकीची होते.
8,(299) - पत्नी मुलगी ने चूक केल्यास त्यांना दोराने किंवा काठीने मारावे.
9,(18) - स्त्रियांना वेदाभ्यासाचा अधिकार नाही.
4,(206) - स्त्रीला बुद्धीमत्ता नसते. किंवा मुक्त इच्छा , विचारस्वातंत्र नसते. त्यानी बौद्ध धर्मासारख्या पाखंडी मार्गाने जाऊ नये. तिने जर त्याच मार्गाने जाण्याचा निर्धार केला असेल तर मेल्यावर अश्या स्त्री च्या तोंडात पाणी सुद्धा टाकू नये.
5,(151) - विवाहीत स्त्रीने पती हयात असेपर्यंत त्याच्या आद्न्येत रहावे.
5,(154) - जरी पती दरिद्री असला किंवा गुणवान असला किंवा अन्य ठिकाणी आनंद उपभोगत असेल किंवा उत्तम गुणवत्तेचा अभाव असेल तरीही पतीला परमेश्वर मानून त्याची श्रद्धापुर्वक पूजा केली पाहीजे.
9,(4) - योग्य वेळी मुलीचा विवाह करीत नाही तो पिता दोशी असतो. पहिल्या मासिक पाळी नंतर 3 वर्षाच्या आत मुलीचा विवाह झाला पाहीजे.

   अश्या प्रकारचे अनेक अनैतीक कायदे मनुने मांडले. ब्राम्हणशाहीचे वर्चस्व व ब्राम्हणी सत्तेसाठी परिपूर्ण तरतूद मनुच्या कायदियानी समाजात रोवली. ही एक प्रकारची ब्राम्हणी हुकुमशाही होती. आणि म्हणूनच बाबासाहेबांना या मनुला पेटवावे लागले. 

No comments:

Post a Comment

                            घोडेबाजार  त्या अलिशान हाॅटेलाच्या संडासात लपवलेला फोन स्विच ऑन करताच थरथर करून वाजला. हाय, हॅलो ची औपचारिकता न ...